ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन   

नवी दिल्ली : ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक, वन्य जीव रक्षक आणि लेखक वाल्मिक थापर यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. थापर यांनी आपले आयुष्य वन्य जीवांचे रक्षण करण्यात वेचले. त्यात प्रामुख्याने राजस्तानातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील वाघांचा समावेश होता. नवी दिल्लीत १८५२ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. १९८८ मध्ये त्यांनी रणथंबोर अशासकीय फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्या माध्यमातून समुदाय पातळीवर वाघांचे संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी पावले उचलली होती. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी थापर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून रणथंबोर येथील त्यांचे कार्य विसरता येणार नाही, असे सांगून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रणथंबोरमधील जैव विविधतेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी वन मंत्री असताना माझ्याशी अनेकदा संपर्क साधला होता. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना थापर यांनी मौलीक सल्ले दिले होते, अशी पोस्टही रमेश यांनी एक्सवर टाकली.  दरम्यान, थापर कुटुंबाचे विविध क्षेत्रांत अमूल्य योगदान आहे. त्यांचे वडील रोमेश पत्रकार होते. त्यांची मावशी रोमिला इतिहासतज्ज्ञ, चुलते करण थापर पत्रकार होते. 

Related Articles